spot_img
ब्रेकिंगविधानसभेसाठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी; उद्धव ठाकरे यांनी उघडला पत्ता

विधानसभेसाठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी; उद्धव ठाकरे यांनी उघडला पत्ता

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री
भाजपला हरवू शकतो हे महाविकास आघाडीने राज्यात दाखवून दिले. महाविकास आघाडीत सध्या अभुतपूर्व उत्साह आहे. महाविकास आघाडी आता देशभरात मोठा प्रयोग राबविण्याच्या तयारीत आहे. लोकसभेतील यशाची मालिका खंडीत होऊ नये यासाठी मोठी खलबतं सुरु आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चेची प्राथमिक फेरी पार पडली. त्यानंतर तिन पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली. यात उद्धव ठाकरे यांनी काही पत्ते उघड केले.

जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विजयामुळे महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. आता त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांवर पण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

नॅरेटिव्ह तर त्यांनीच सेट केला

विरोधकांनी जनतेत चुकीचा संदेश दिला. एक नॅरेटिव्ह सेट केला म्हणून भाजपला फटका बसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी तडक उत्तर दिले. त्यांच्याच लोकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे. त्यांनीच हा नरेटिव्ह सेट केला होता. अच्छे दिनाच्या नरेटिव्हचं काय झालं. १५ लाखाचं काय झालं. २०१४ पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कुणी सेट केलं, असा हल्लाबोल त्यांनी महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चहा विक्रेत्याचा मुलगा झाला डॉक्टर!; डोळ्यात पाणी आणणारा जीवन प्रवास..

जामखेड । नगर सहयाद्री बारावी परिक्षा पास झाल्यानंतर कोणतेही लाज न बाळगता चहाच्या दुकानात...

बीड का बिहार? विवाहितेचे ‘तसले’ फोटो केले व्हायरल!

Crime News: बीड आणि परभणीच्या घटनांनी सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. महाराष्ट्रातील कायदा...

कर्जमाफीवर बच्चू कडूनंतर आता राजू शेट्टी आक्रमक, सरकारला थेट इशारा, काय म्हणाले..

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तापला आहे, विधानसभा...

मळगंगा देवीच्या यात्रेत पाणीटंचाईचे संकट! निघोजकरांनी कुणाला घातले साकडे?

फक्त चार दिवसांचे पाणी शिल्लक; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आमदार काशीनाथ दाते यांना साकडे निघोज |...