spot_img
ब्रेकिंगराज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला तापमान कमीच राहिले. यामुळे उन्हाची चालूल देखील यंदा उशिराने लागली आहे. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना रात्रीच्यावेळी अजून देखील थंडी जाणवत आहे. तरी देखील आज राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उन्हाळ्यातील एप्रिल व मे हे आणखी दोन महिने हिट अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक शहरात तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पारा ३६ अंशांवर तो आठवडाभरानंतर म्हणजे २४ मार्चला ४१ अंशावर पोहचला असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील काहीसा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...