spot_img
ब्रेकिंगराज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला तापमान कमीच राहिले. यामुळे उन्हाची चालूल देखील यंदा उशिराने लागली आहे. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना रात्रीच्यावेळी अजून देखील थंडी जाणवत आहे. तरी देखील आज राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उन्हाळ्यातील एप्रिल व मे हे आणखी दोन महिने हिट अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक शहरात तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पारा ३६ अंशांवर तो आठवडाभरानंतर म्हणजे २४ मार्चला ४१ अंशावर पोहचला असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील काहीसा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...