spot_img
ब्रेकिंगराज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा ४० शी पार, वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला तापमान कमीच राहिले. यामुळे उन्हाची चालूल देखील यंदा उशिराने लागली आहे. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना रात्रीच्यावेळी अजून देखील थंडी जाणवत आहे. तरी देखील आज राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उन्हाळ्यातील एप्रिल व मे हे आणखी दोन महिने हिट अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक शहरात तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पारा ३६ अंशांवर तो आठवडाभरानंतर म्हणजे २४ मार्चला ४१ अंशावर पोहचला असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील काहीसा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...