spot_img
अहमदनगरसुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते. बावीस दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. अशातच सासरी गेलेली नव वधू आनंदात होती. नवरी घरात असल्याने जल्लोषाचे वातावरण होते. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले.

सुरज महादेव मिसाळ या बावीस वर्षीय तरुणाचा लग्न झाल्यानंतर अवघ्या बावीस दिवसातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल हे दूकान चालवत होता. दि २४ मे रोजी मेडिकल मधुन घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मिसाळ कुटुंबिय तसेच नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका मतदारयादीत साडेदहा हजार दुबार नावे, पुढे काय होणार..

 मनपाकडून तपासणी | दुबार नाव असल्यास कोणत्या केंद्रावर मतदान करणार याबाबत अर्ज घेणार अहिल्यानगर...

अर्ज माघारी घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी; कुठे घडला प्रकार

राजकारण तापले | भाजप उमेदवाराकडून काँग्रेस उमेदवाराला दमबाजी बीड | नगर सह्याद्री राज्यात सध्या स्थानिक...

अहिल्यानगर महापालिकेची राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप; काय घडलं पहा…

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक...

कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; पारनेरचे तिघे अडकले जाळ्यात

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पारनेर पंचायत समितीचे अधिकारी...