spot_img
अहमदनगरसुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते. बावीस दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. अशातच सासरी गेलेली नव वधू आनंदात होती. नवरी घरात असल्याने जल्लोषाचे वातावरण होते. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले.

सुरज महादेव मिसाळ या बावीस वर्षीय तरुणाचा लग्न झाल्यानंतर अवघ्या बावीस दिवसातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल हे दूकान चालवत होता. दि २४ मे रोजी मेडिकल मधुन घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मिसाळ कुटुंबिय तसेच नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...