spot_img
अहमदनगरसुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते. बावीस दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. अशातच सासरी गेलेली नव वधू आनंदात होती. नवरी घरात असल्याने जल्लोषाचे वातावरण होते. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले.

सुरज महादेव मिसाळ या बावीस वर्षीय तरुणाचा लग्न झाल्यानंतर अवघ्या बावीस दिवसातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल हे दूकान चालवत होता. दि २४ मे रोजी मेडिकल मधुन घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मिसाळ कुटुंबिय तसेच नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...