spot_img
अहमदनगरपाणी पुरवठा सुरळित करा अन्यथा जल आंदोलन करणार; कोणी दिला इशारा?

पाणी पुरवठा सुरळित करा अन्यथा जल आंदोलन करणार; कोणी दिला इशारा?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नागरिकांना पाणीपट्टी भरमसाठ आकारण्यात आली आहे. मग त्यांना सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसापासून शहरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकंती करावी लागत आहेत. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. नळाला पाणी आले, तर ते कमी दाबाने येत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उन्हाळ्यात नागरिकांचे असे हाल करणे दुर्दैवी आहे.

मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. लवकरात लवकर पाणी प्रश्नावर तोडगा काढून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांसह शहरात जल आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. शहरातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले व चर्चा केली.गेल्या पंधरा वीस दिवसांपासून महानगरपालिकेचा पाणी पुरवठा व्यवस्थापन संपुर्ण शहरात विस्कळीत झाले आहे.

शहराचे उपनगर असलेले केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, नागापुर, सावित्रीबाई फुलेनगर, विनायकनगर, फुलसौदंर मळा, बुरुडगाव रोड, तसेच नगर शहरामधील मध्य वस्तीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन ऊन्हाळयाच्या दिवसात सर्व नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गरज असतानाच पालिकेकडून त्यांना पाणि उपलब्ध होत नाही. कर्मचा-यांचे फोन बंद असतात. विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. तरी आपण स्वतः लक्ष घालुन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरीकासंह जन आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...