spot_img
ब्रेकिंगऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! एफआरपी बाबत कोर्टाचा आदेश..

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! एफआरपी बाबत कोर्टाचा आदेश..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश दिले आहेत. यासह, शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.

शेतकऱ्यांना ऊसाच्या दरासंदर्भात होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एफआरपी एकरकमीच द्यावी असे आदेश दिले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना ऊस विक्रीनंतर संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळणार आहे.

या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारचा 21 फेब्रुवारी 2022 चा शासन निर्णय रद्द केला आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला होता.

यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होत होता आणि कारखानदारांना फायदा मिळत होता. या निर्णयाविरोधात राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच न्यायालयाने त्याच याचिकेवर निकाल देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....

नागपूरमधील घटना ‘त्यांच्या’ सुनियोजित पॅटर्न; सी.एम. फडणवीस यांनी संगितला घटनाक्रम..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून...

गुलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा टिझर रिलीज!

मुंबई । नगर सहयाद्री:- बिग बॉस मराठी सिझन 5 च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाणनेआपलं...

जनाची नाही तर मनाच तरी ठेवा! उपमुख्यमंत्री शिंदे कुणावर बरसले?, औरंगजेबाच्या कबरीमुळं वादंग…

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील खुल्दाबादमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरून वाद पेटला आहे....