spot_img
ब्रेकिंगसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 'हे' काम केल्यास निलंबन होणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ काम केल्यास निलंबन होणार

spot_img

Government Employee Rules: राज्याच्या महसूल विभागात आता ‘सुट्टीवर चाललोय’ म्हणत मुख्यालय सोडणं सहज शक्य राहणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आदेश देत स्पष्ट केलं आहे की, पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास संबंधित अधिकारी वा कर्मचारी यांच्यावर थेट निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई होईल. या आदेशामुळे शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राज्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, जमाबंदी आयुक्त यांच्यावरील नियंत्रण आता अधिक कडक होणार आहे. अनेक वेळा हे अधिकारी मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी महसूलमंत्र्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. पडताळणीत त्या खरी ठरल्याने आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

सरकारी कामामध्ये अनेकदा सामान्य नागरिकांना ताटकळत बसावं लागतं. कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असतील तर जनतेची गैरसोय होतेच, शिवाय कामकाजाची गतीही मंदावते. हीच पार्श्वभूमी पाहता महसूलमंत्र्यांनी आदेश दिले की, “कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणार नाही.” यास अपवाद फक्त शासकीय सुट्ट्या आणि अधिकृत दौरे यांना आहे.

हा आदेश केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांना देखील याचाच भाग मानण्यात येईल. कोणत्याही अधिकाऱ्याने जर विनापरवानगी मुख्यालय सोडलं तर त्याच्या वरिष्ठालाच जबाबदार धरलं जाईल. दरम्यान, ही कारवाई प्रशासनात शिस्त, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता अबाधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘लाडकी बहीण’ योजनेचा जूनचा हप्ता ‘या’ महिलांना मिळणार नाही; नवी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ तीन राशींसाठी आजचा दिवस शुभ

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आजवर दबून राहीलेले सुप्त प्रश्न उभे राहील्यामुळे मानसिक...

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! तीन आरोपी जाळ्यात..

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- पाथर्डी तालुक्यात आणि नगर परिसरात भीती निर्माण करणाऱ्या घरफोडी व...

वीजपुरवठा खंडित; नागरिक वैतागले; आमदार जगताप यांना दिले निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून,...