spot_img
ब्रेकिंगमाझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

spot_img

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी स्पष्ट केले की, मी फडणवीस यांच्या आईविषयी काहीही बोललो नाही. जर काही शब्द चुकून गेला असेल तर मी तो माघारी घेतो.

पण याचवेळी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत म्हटले की, पोलिसांनी आमच्या आई-बहीणींना मारले, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे, तशीच आमचीही आई आमच्यासाठी प्रिय आहे. मराठ्यांना आरक्षण दे, आम्ही तुझ्या आईची पूजा करू.त्याचप्रमाणे त्यांनी चित्रा वाघांवर नाव न घेता कडवट शब्दांत हल्ला चढवला.

ती जी बाई बोलली, कोण वाघीण… आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, तेव्हा तू कुठे होतीस? आता जागी झाली? तू माझ्या नादी लागू नकोस, तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. २७ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आले. दरम्यान, मनोज जरांगेंच्या विधानांनंतर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...

शहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटवा; कोणी केली मागणी?

सकल हिंदू समाज बांधवांची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री रस्त्याच्या मधे येणारी धार्मिक...