spot_img
महाराष्ट्रसुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे लढत झाली तर मग मात्र आम्ही...रोहित पवारांनी सांगितली...

सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे लढत झाली तर मग मात्र आम्ही…रोहित पवारांनी सांगितली रणनीती

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. सध्या अनेकांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. तेथे पवार कुटुंबियांमध्ये लढत होणारा असल्याचे स्पष्ट संकेत सध्या मिळत आहे. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे लढत रंगणार असल्याचे सध्या दिसत आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटालाच आहे तर महायुतीत अजित पवार यांच्या गटाला ही जागा देण्यात येणार आहे. या लढतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी शरद पवार गटाची रणनीती सांगितली.

आ. रोहित पवार म्हणाले…
बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळे बारामतीत खरी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा अशी होणार आहे. यामुळे प्रचारात आम्ही अजित दादांविरोधात बोलू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी अजित पवार यांना शिरुरची जागा मिळणार नाही, असा दावा केलाय. ते म्हणाले, शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना पाडणार असे अजित पवार म्हणतात. या मतदार संघात अमोल कोल्हे विरोधात पार्थ पवार ही असू शकतात. परंतु अजितदादांना महायुतीत चारच जागा मिळणार आहेत. त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही असे म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान नगरकरांनो! शहरातील भेसळयुक्त तुपाचा पर्दाफाश, पुण्यात तयार करून नगर शहरात विक्री

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- नगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांची गुंडागिरी?, दुकानदाराला मारहाण!, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या...

आजचे राशी भविष्य! आजचा दिवस नवीन यशांनी भरलेला, वाचा कोणाच्या आयुष्यात येणार भरभराट?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे...

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....