spot_img
ब्रेकिंग"अशी पावलं टाकली तर... " ; वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

“अशी पावलं टाकली तर… ” ; वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

spot_img

पुणे । नगर सहयाद्री:-
महंत रामगिरी महाराजांच्या नुकत्याच वादग्रस्त वक्तव्यामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहेत. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरसह अन्य ठिकाणी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील नाव न घेता निशाणा साधत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा थेट उल्लेख न करता, सामाजिक ऐक्याला धक्का बसेल, अशी पावलं टाकली तर तो वारकरी संप्रदायाचा विचार नाही. पिढ्यांपिढ्या एकसंघ राहिलेल्या समाजात छोट्या- मोठ्या प्रसंगातून कटुता झालेली पाहायला मिळते. चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारी लोकं आहेत, असं शरद पवार म्हणाले.

समाजाच्या व्यापक हिताचा विचार करणारी लोकं देखील या क्ष्रेत्रात आहेत. त्यांची संख्या कमी असेल. ज्ञानोबा आणि संत तुकाराम यांचे विचार ऐकले. तुकोबांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या हिताची भूमिका घेतली होती. ढोंगी राजकारण आणि ढोंगी समाजकारण करणार्‍यांना चोख उत्तर दिलं. समाजाला योग्य दिशेला नेण्याचं काम केलं, असं शरद पवार म्हणाले.

मी आज भाषण करायला नाही तर ऐकायला आलोय. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आपण कार्यक्रम नाही केले पाहिजे. महत्त्वाची गरज म्हणजे एक समाज तयार व्हायला पाहिजे तो समाज पुरोगामी पाहिजे. वारकरी सांप्रदय म्हणून काम करणारे अनेक लोकं आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची अनेक वेळा संधी येते. ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात, धर्म बघून भूमिका घेतात, असा टोला शरद पवारांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...