spot_img
देशPolitics News: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मल्लिकार्जुन खरगे यांनी संगितला...

Politics News: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मल्लिकार्जुन खरगे यांनी संगितला आकडा, एकदा पहाच..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागा जिंकणार असल्याचा महत्त्वपूर्ण दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी इंडिया आघाडीच्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात आम्हाला किमान ४६ जागा मिळतील असे वातावरण आहे. भाजप प्रणित महायुतीला शून्य जागा मिळतील असे मी म्हणत नाही. त्यांनाही काही ना काही जागा मिळतील. पण आमची आघाडी अधिकाधिक जागा जिंकून भाजपला हरवेल, असे ते म्हणाले.

मुंबईत शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. या परिषदेला मल्लिकार्जुन खरगेंसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे बडे नेते हजर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्रात विश्वासघात करून बेकायदा सरकार अस्तित्वात आले. त्याचे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. एवढेच नाही तर समाजात दुही माजवण्याची भाषाही ते करतात. आपले विचार चुकीच्या पद्धतीने मांडून लोकांना भडकवण्याचे काम आजवर कोणत्याही पंतप्रधानाने केले नाही. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो.देशात विश्वासघाताचे राजकारण सुरू आहे. मोदी सरकार संविधानाचा गैरवापर करत आहे. धमकी, प्रलोभने दाखवून विरोधी पक्षांत फूट पाडली जात आहे. सत्याची बाजू मांडणार्‍या पक्षांकडून पक्ष व चिन्ह काढून भाजपचे समर्थन करणार्‍या गटांकडे सोपवण्यात येत आहे. या सर्व गोष्टी मोदींच्या इशार्‍यानुसार होत आहेत. पण यावेळी जनता फसणार नाही.

आता ही लढाई खुद्द जनता लढत आहे. त्यात निश्चितच जनतेचा विजय होईल, असेही खरगे यावेळी बोलताना म्हणाले.पंतप्रधान मोदी लोकशाहीची वल्गना करतात. पण लोकशाहीवर अंमल करत नाहीत. त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. गत २ वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. ही मोदींची लोकशाही आहे, असेही मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी इंडिया आघाडीने जनतेला दिलेल्या गॅरंटीवरही प्रकाशझोत टाकला. इंडिया आघाडीने जनेतला अनेक चांगली आश्वासने दिली आहेत.

यात रिक्त जागा भरणे, तरुणांना रोजगार मिळवून देणे, मनरेगा अंतर्गत शहरी भागातील लोकांना कामे देणे, तरुणांना १ लाखांचे अनुदान देणे, महिलांना महालक्ष्मी योजनेतून वार्षिक १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, २५ लाखांचा आरोग्य विमा, शेतकरी व विद्यार्थ्यांना कर्जमाफी देणे, कृषी सामग्रीवरील जीएसटी रद्दबातल करणे आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे, असे देखील खरगे यावेळी म्हणाले. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी देशात आघाडीचे सरकार येणे आवश्यक आहे. देशात आमचे सरकार येणार हे पूर्वनिश्चित असून, यापुढे धमक्यांचे राजकारण चालणार नाही, असेही मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी भाजपला खडसावून सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...