spot_img
अहमदनगरकृषी दुकानाला भीषण आग! लाखोंची खते जळून खाक, कुठे घडली घटना?

कृषी दुकानाला भीषण आग! लाखोंची खते जळून खाक, कुठे घडली घटना?

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा शहरातील मार्केटयार्ड मधील एका खताच्या दुकानाला आज सकाळी (२७ मार्च) आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की ५० ते ६० फूट उंचीचे धुराचे लोट दिसत होते.

अधिक माहिती अशी : श्रीगोंदा मार्केटमध्ये एक खताचे दुकान आहे. या ठिकाणी रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशक, औषधांची विक्री केली जाते. बुधवारी सकाळी अचानक दुकानाला आग लागली. ही घटना मार्केटमधील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तसेच गौरी शुगर कारखान्याच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.

दरम्यान दोन्ही अग्निशामक विभागाचे बंब अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. या बंबाने पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोयात आली. या दुकानात ठेवलेले खते व बी बियाणे जळून खाक झाले असल्याने त्यात लाखो रुपयांचे नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. नागरिकांनी व अग्निशामक दलांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोयात आणली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...