spot_img
ब्रेकिंग'त्यांचे' परळी ते मुंबई बरेच लफडे!; जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंची टीका, वाचा..

‘त्यांचे’ परळी ते मुंबई बरेच लफडे!; जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंची टीका, वाचा..

spot_img

जालना । नगर सहयाद्री:-
धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. धनंजय मुंडेंना जातीयवाद निर्माण करायचा आहे. तेच प्रतिमोर्चे काढायला लावत आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो का? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यातील विविध शहरांत मोर्चे काढले जात आहेत. शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी जालना शहरात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीमहाराज चौकातून रिंग रोडने हा मोर्चा आंबड चौफुलीकडे निघाला होता. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ह्या मागणीसाठी हजारो लोकं एकत्र जमले होते. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात जरांगे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी बोलो तर जातीयवाद होतो का? धनंजय देशमुख यांना तुम्ही पोलीस ठाण्यात धमकी देतात. आम्ही गुंडांवर बोलायचे नाही का? धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. ते ओबीसीचे पांघरुण घेत आहे. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो असं आहे का? जनता मंत्र्यांनाच बोलत असते. रस्त्यावर फिरू देणार नाही हे जनता रोषाने बोलते, असे मनोज जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंना जातीयवाद निर्माण करायचा आहे. तेच प्रतिमोर्चे काढायला लावत आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. आम्ही आमच्या गरीब लेकरांच्या बाजूने बोलायचे नाही का?मराठ्यांना आरक्षण मागतोय हा कोणता जातीयवाद आहे, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

ते जातीय तेढ निर्माण करत असून लाभार्थी टोळीला आमच्याविरोधात बोलायला लावत आहे. धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. त्यांना 25 तारखेनंतर कायदेशीर बघणार. त्यांना सांगितले होते खेटू नका ते खेटले मग आता त्यांना बघणार. ते गुंडाच्या टोळ्या सांभाळत आहेत. अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा! गर्भवती महिलेला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; आ. सत्यजीत तांबे विधानसभेत गरजले

संगमनेर । नगर सहयाद्री:- राज्यातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध...

नगरमध्ये फसवणुकीचा मोठा प्रकार; एजन्सीच्या नावाखाली ‘ईतक्या’ लाखाला गंडा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विमान तिकीट बुकिंग एजन्सीच्या नावाखाली दिल्या जाणार्‍या कमिशनचे आमिष दाखवून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘गरुपोर्णिमा’ आनंदाचा दिवस, पहा तुमचे भविष्य?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य...

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...