spot_img
ब्रेकिंगपुढील २४ तास धो-धो पाऊस! पुणे, नाशिकला रेड अलर्ट, मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा...

पुढील २४ तास धो-धो पाऊस! पुणे, नाशिकला रेड अलर्ट, मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
राज्यभरात पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून, आजही पावसाने उसंत घेतली नसल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई शहरात सर्वाधिक १४२,६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :-
ठाणे ९०.३
रायगड १३४.१
रत्नागिरी ६०.९
सिंधुदुर्ग ९.४
पालघर १२०.९
नाशिक ४०.३
धुळे २५.५
नंदुरबार ३३.४
जळगाव ४.७
अहिल्यानगर ८.७
पुणे २९.३
सोलापूर ०.३
सातारा १७.७
सांगली ५.९
कोल्हापूर १२.१
छत्रपती संभाजीनगर ४.५
जालना २.१
बीड ०.२
धाराशिव ०.२
नांदेड ०.६
परभणी ०.५
हिंगोली ०.८
बुलढाणा ३.१
अकोला ८.६
वाशिम १.७
अमरावती ५.९
यवतमाळ १.२
वर्धा ३.२
नागपूर ०.७
भंडारा ०.३
चंद्रपूर ४.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई उपनगरात झाड पडून एक व्यक्ती जखमी, तर सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक पाळणा तुटून एकाचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे ता. संगमेश्वर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

सागरी किनारपट्टींवर उच्च लाटांचा इशारा
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागात ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. हा इशारा १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते १९ जून २०२५ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत लागू असणार आहे.

मुंबई आणि उपनगरमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परिणामी पुढील काही तासांमध्ये रस्ते वाहतुकीची कोंडी होऊ शकते. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असणार्‍या लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मि उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेच्या बदलापूर, कर्जतकडून मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान, पाऊसमान बघूनच घरातून बाहेर पडा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शयता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने यलो अलर्ट अपग्रेड करत ऑरेंज केला असून आज दिवसभरात मुंबईत ७० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीत पावसाचा चांगलाच जोर आहे. कोकण किनार्‍यावर मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पसरले आहेत. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसह कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरात बहुतेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शयता आहे. मेघगर्जनेसह वेगवान वार्‍यांसह पावासाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वसई-विरार, बोरिवली, अंधेरी, चर्चगेट या भागातही पावसाचा जोर रात्रीपासून कायम आहे.

पुण्यात तुफान पाऊस! खडकवासला धरण ७५ टक्के भरले
पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण ७५ टक्के भरले. या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुठा नदीत २००० युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील खडकवासला धरण मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण ७५ टक्के भरले.् त्यामुळे धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २००० युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

रायगडला रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी
रायगड आणि पुणे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाचा जोर प्रचंड वाढलेला दिसत आहे. गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात १३४ मिलीमीटर पावससाची नोंद झाली असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.याच पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच पुण्यातही सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून पुणे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यातील हिंगणे खुर्द येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून प्रचंड गैरसोय होत आहे. पुण्याच्या हांडेवाडीलाही पावसाचा फटका बसला असून हांडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरातही प्रचंड पाणी साचलं आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकर्‍यांना दिलासा : फळपिक विमा भरण्यासाठी मुदत वाढविली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून विमा...

वर्धापनाच्या दिवशीच ठाकरेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा जय महाराष्ट्र…

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे मुंबईसह राज्यात राजकीय घडामोडींना...

लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय; आता पतसंस्था स्थापन करून..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय...

महापालिकेवर भगवा फडकविणार; नगरमध्ये ठाकरे, शिंदे सेनेचे पदाधिकारी काय म्हणाले पहा…

शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा | श्री विशाल गणपती मंदिरात आरती; नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप अहिल्यानगर...