spot_img
महाराष्ट्रसावधान! राज्यात उष्णतेचा कहर; ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार?

सावधान! राज्यात उष्णतेचा कहर; ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाल्याच चित्र बघायला मिळत आहे. परिणामी नागरिकांना होळी पूर्वी प्रचंड उष्ण व दमट हवामानाला सामोर जावं लागत आहे.नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज 11, 12 आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने कहर केलाय. सोमवारी पुणे, नंदुरबार शहरांचा पारा 39.5, तर अकोला शहराचे तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर गेलाय. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर असलेल्या नाशिक शहरातील तापमानाचा पारा सुद्धा वाढलाय. सोमवारी उष्णतेची लाट चांगलीच जाणवली. पुणे, नंदुरबार, मुंबई ही शहरे चांगलीच तापली होती. मात्र, काही भागांतील कमाल तापमानात किंचित घट झाल्याची नोंद करण्यात आली.

कमाल तापमानाचा पारा एक अंशाने कमी झाला होता. मात्र पुण्यासह, नंदुरबार आणि अकोला शहरांचा पारा सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक ठरला. नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला असून तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबई आणि तेथील सांताक्रुझ भागाचा पारा अनुक्रमे 36.4 आणि 37.2 अंशांवर गेला होता. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाचा धारा वाहू लागल्या होता. यावर्षाच्या हंगामात मुंबईचे तापमान सलग तिसर्‍यांदा 36 अंशांपेक्षा जास्त वाढले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात मोठे मंत्री हनी ट्रॅपमध्ये, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात...

भयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान...

संदीप थोरात आणखी गोत्यात; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा, पत्रकार परिषदेत मोठी माहिती उजेडात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि....

डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते?; किरण काळे यांचा सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या...