spot_img
अहमदनगरमहाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट? हवामान विभागाची धडकी भरवणारी माहिती..

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट? हवामान विभागाची धडकी भरवणारी माहिती..

spot_img

Maharashtra Weather Update: राज्यातील थंडी गायब होऊन आता तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढायला सुरूवात झाली आहे. राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील तापमान ३७ अंशावर पोहचले आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडमध्ये सर्वात निचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत तापमानात फारसा बदल होणार नाही. ज्यातील तापमानात सध्या जसे आहे तसेच राहिल. सध्या राज्यातील कमाल तापमान सातत्याने ३५ अंश सेल्सिअसच्या वरती जात असल्यामुळे उन्हाची चाहूल लागली आहे. पहाटे हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सकाळची थंडी आणि हलके धुके पाहायला मिळत आहेत. तर दुपारी तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांनी आता ऊन वाढत असल्यामुळे आपली काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पहाटे थोडासा गारवा जाणवत आहे आणि दुपारी उन्हाच्या झळा लागत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री...

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वावादी संघटनांचा रविवारी मेळावा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची...

‘कोठला परिसरात डेंग्यू मुक्त अभियान’; आयुक्त डांगे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसर्‍या आठवड्यात कोठला परिसरात...

तयारीला लागा! भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन; महापालिकेवर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर...