spot_img
महाराष्ट्रकाळजाचा थरकाप उडवणारी घटना; लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू!

काळजाचा थरकाप उडवणारी घटना; लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू!

spot_img

Maharashtra News Today: काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या २ दिवस आधीच एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरूण दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. नंतर वाहनचालक फरार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चकनाचूर झाला आहे. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. फरार वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. आज सकाळी अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश तनपुरे असे मृत तरूणीचे नाव आहे. तो सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी गावचा रहिवासी होता. गणेश याचा २ दिवसानंतर विवाह सोहळा असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मात्र, लग्नाच्या २ दिवस आधीच गणेशचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरूण दुचाकीवरून जात होता. यादरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली.

धडक दिल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पलायन करत असताना वाहन चालकाने त्याला दोनशे फूट फरफटत नेले.फरफटत नेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला आणि दुचाकीचेही अनेक भाग रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करीत आहेत. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...