spot_img
महाराष्ट्र'लहरी वातावरणामुळे आरोग्य धोक्यात'

‘लहरी वातावरणामुळे आरोग्य धोक्यात’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
वातावरणाच्या लहरीपणामुळे कधी गारठा, तर कधी उकाडा असा अनुभव सध्या येत आहे. ऐन थंडीच्या कालावधीत विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होऊ लागली आहे. सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गच्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यांत जात आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत पहाटे गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातही काहीशी अशीच परिस्थिती होती. मुंबईकरांना यंदा दरवर्षीसारखा गारठा अनुभवता आलेला नाही. थंडीच्या हंगामात फारच कमी वेळा १३ ते १६ अंशादरम्यान किमान तापमान नोंदले गेले. याउलट किमान तापमानही अनेकदा वाढतच गेले होते. किमान आणि कमाल तापमानामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असून मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळेच सध्या अबालवृद्ध सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत.

दिवसेंदिवस तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस मुंबईच्या तापमानाचा पारा ३६ अंशापार गेला होता. मुंबईत सध्या दुपारच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऋतुबदलाच्या या काळात सध्या पहाटे गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी तापत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये पहाटेच्या सुमारास अजूनही किंचित गारवा आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईच्या किमान तापमानातही वाढ होत आहे. दरम्यान, तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...

एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला रवाना; कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा...

श्रीगोंद्यात मंदिरांची विटंबना! दारु पिऊन उच्छाद, समाजकंटकांची हातात कोयते, गज घेऊन दहशत..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील काष्टी गावातील काही समाजकंटकांकडून मद्यपान करून ग्रामदेवतांच्या मंदिरांची विटंबना होत...

आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा! गर्भवती महिलेला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; आ. सत्यजीत तांबे विधानसभेत गरजले

संगमनेर । नगर सहयाद्री:- राज्यातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध...