spot_img
महाराष्ट्र'लहरी वातावरणामुळे आरोग्य धोक्यात'

‘लहरी वातावरणामुळे आरोग्य धोक्यात’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
वातावरणाच्या लहरीपणामुळे कधी गारठा, तर कधी उकाडा असा अनुभव सध्या येत आहे. ऐन थंडीच्या कालावधीत विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होऊ लागली आहे. सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गच्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यांत जात आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत पहाटे गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातही काहीशी अशीच परिस्थिती होती. मुंबईकरांना यंदा दरवर्षीसारखा गारठा अनुभवता आलेला नाही. थंडीच्या हंगामात फारच कमी वेळा १३ ते १६ अंशादरम्यान किमान तापमान नोंदले गेले. याउलट किमान तापमानही अनेकदा वाढतच गेले होते. किमान आणि कमाल तापमानामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असून मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळेच सध्या अबालवृद्ध सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत.

दिवसेंदिवस तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस मुंबईच्या तापमानाचा पारा ३६ अंशापार गेला होता. मुंबईत सध्या दुपारच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऋतुबदलाच्या या काळात सध्या पहाटे गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी तापत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये पहाटेच्या सुमारास अजूनही किंचित गारवा आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईच्या किमान तापमानातही वाढ होत आहे. दरम्यान, तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...