spot_img
देश'भारत-चीन विमान सेवेला हिरवा कंदील'

‘भारत-चीन विमान सेवेला हिरवा कंदील’

spot_img

नवी दिल्ली- हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार असून दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावले उचलली जात आहेत.

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी २६-२७ जानेवारीला चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चीनी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, ज्यात दोन्ही देशांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत- चीन संबंध बिघडले होते.

डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांनी २०२५ च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित यंत्रणा विद्यमान करारांनुसार यावर चर्चा करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...