spot_img
महाराष्ट्रकृतनिश्चयी प्रधानसेवक!

कृतनिश्चयी प्रधानसेवक!

spot_img

Former Prime Minister Manmohan Singh : साधारण 2012 पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले मनमोहन सिंग हे कसे कचखाऊ आहेत, त्यांचे सरकार कसे भ्रष्टाचारी आहे आणि या भ्रष्ट सरकारमुळेच महागाई कशी वाढते आहे, देश गाळात जातो आहे आदी प्रचार सुरू झाला होता. सिंग यांनी त्यावर कोणतेही मतप्रदर्शन केले नाही- ते त्यांच्या स्वभावातही नव्हते. ‌‘मी काम करण्यासाठी या पदावर आलो आणि ते काम मी करणार‌’ एवढाच त्यांचा बाणा होता. मुळात मुखदुर्बळ म्हणावेत असे डॉ. सिंग, त्यांच्या पंतप्रधान- पदाच्या अखेरच्या दोन वर्षांत अधिकच अबोल झाले होते. त्यात तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखज आणि संरक्षणमंत्री ए के अँटनी यांच्या अ-कर्तृत्वाची भर पडल्याने हे सरकार धोरणलकवा असलेले आहे, अशी टीका सर्रास होऊ लागली होती.

वास्तविक, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काळात अनेक महत्वाच्या धोरणात्मक सुधारणा घडून आल्या. ‌‘मनरेगा‌’ म्हणून ओळखली जाणारी रोजगार हमी योजना असो की लहान शहरांमध्ये सुविधा देण्यासाठी कार्यरत झालेली जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजना अनुदानांपासून दूर जाणाऱ्या आणि आर्थिक वाढीचा विचार करणाऱ्या अनेक योजनांची सुरुवातही या काळात झाली होती.

लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते, याचा सर्वाधिक फटका त्या काळात सिंग यांना बसला. या एका वर्षात बहुसंख्य भारतीयांना, आर्थिक विकासाची समदृष्टी असलेल्या याच नेत्यामुळे 2008 चे जागतिक अर्थसंकट भारताच्या उंबरठ्याबाहेरच राहिले याचाही विसर पडला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीदतील सर्वात महत्त्वाचे काम म्हणून भारत- अमेरिका अणुऊर्जा कराराचा उल्लेख केला जातो. या कराराला संसदेची मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी आपले पद पणाला लावले.

अखेर या करारावर संसदेची मोहोर उमटली आणि भारतीय अणुसंशोधनाचा वनवास कायमचा संपुष्टात आला. राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगताही नेतृत्व दिसू शकते, देशाला दिशा देऊ शकते, याचा प्रत्यय त्या वेळी जसा आला, तसा त्याहीआधीच्या 1991 ते 1996 या काळात देशाचे अर्थमंत्री म्हणून, एकेकाळचे रिझर्व्ह बँक गव्हर्नर सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा बदलली, तिला नव्या वाटेवर उभे केले आणि चालण्याची शक्तीही दिली. सोने गहाण ठेवण्याची नामुष्की आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात 7 टक्क्‌‍यांचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढदर प्रथमच (1994 मध्ये) पाहिला.

अनुदाने हवी, पण विकास अनुदान-आधारित असू नये, त्यासाठी रोजगारसंधीच हव्यात आणि त्या वाढवण्यासाठी उत्पादक उद्याोग हवे, हे सांगण्याची समज त्यांच्याकडे अर्थातच होती पण काही अनुदाने सुरू ठेवावी लागतील हे मान्य करण्याचा प्रांजळपणाही त्यांच्या ठायी होता. उद्याोजकांच्या फिक्की किंवा असोचॅम यांसारख्या संस्थांच्या व्यासपीठांवर पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली भाषणे ही त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाची साक्ष देणारी आहेत.

अशा नेत्यावर राजकीय हेतूंनी शरसंधान होत असतानाच्या काळात त्यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांचे द ‌‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर‌’ या शीर्षकाचे पुस्तक आले आणि ते शीर्षकच सिंग यांना हिणवण्याचे साधन ठरले. पंतप्रधान पदासाठी स्वत:हून त्यांनी प्रयत्न केले नाहीत हे खरेच, पण एकदा हे पद मिळाल्यानंतर त्याकडे सेवेची संधी म्हणूनच पाहिले. त्या अर्थाने, इतका सच्छील आणि तरीही कृतनिश्चयी “ प्रधान सेवक” यापुढे होणे कठीणच !

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

पाथर्डी | नगर सहयाद्री पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग...

१५०० रुपये कायमचे बंद? लाडकी बहीण योजनेतील १० लाख महिलांचे अर्ज बाद! यादीत तुमचेही नाव नाही ना?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगरमधून एक खळबळजनक...

आजचे राशी भविष्य! आषाढ महिन्यातील मंगळवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह...