spot_img
महाराष्ट्रमहायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक मोठा निर्णय महायुती सरकारनं निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटवण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.

महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमी व हिंदुत्त्ववादी संघटनांकडून राज्यातील गड किल्ल्यांवर वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणं हटवण्याबाबतची सातत्याने करण्यात येत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

31 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना गड किल्ल्यांवरील असलेल्या सर्व अतिक्रमणांची यादी सादर करायची आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्यासंदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र 47 आणि 62 राज्य संरक्षित किल्ले महाराष्ट्रात सध्या आहेत.किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; मोठ्या पवारांनी विषय संपवला, रोहित पवार म्हणाले…

पुणे / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन...

अखेर भाजपने घेतला निर्णय; शहर जिल्हाध्यक्षपदावर कोणाची वर्णी…पहा

अहिल्यानगर शहर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भाजपच्या अहिल्यानगर शहर...

महानगर बँकेसाठी रविवारी मतदान; कुणाच्या बाजूने झुकली निवडणूक?

गीतांजली शेळके यांच्या बाजूने झुकली निवडणूक | कपबशीसाठी सर्व जागांचा कल मुंबई | नगर...

तुरुंगात जाण्याआधी बाजीरावकडून गोरेश्वर मल्टीस्टेटचा विक्री महोत्सव!

तुरुंगात राहून गोरेश्वर पतसंस्था पुन्हा ताब्यात देण्याचे करतोय आर्जव पारनेर | नगर सह्याद्री आर्थिक घोटाळे घालत...