spot_img
महाराष्ट्रबारस्कराचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

बारस्कराचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारस्कर महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर घणघत केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजय बारसकर हा महाराज वगैरे नाही. त्याच्या गावातील लोक बारसकर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात.

एका बलात्काराच्या प्रकरणात तो अडकला होता, ते प्रकरण सरकारकडून दाबले गेल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. आता हेच प्रकरण काढत बारसकर याला माझ्याविरोधात बोलण्याची धमकी दिली गेली आहे. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी दिली गेल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. अंतरवाली येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजय बारसकर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा. त्याला विकत घेतले गेले आहे. अनेक भानगडी केल्या आहेत. त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून ३०० कोटी जमा केले होते. दुसऱ्या गावात भिशीचे पैसे घेऊन तो पळाला होता. आता तो मरणार आहे. फक्त त्याला तुकाराम महाराजांचे नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा मी माझ्या तंद्रीत होतो. तेव्हा चिडचिड होत होती, त्यात मी काही बोलून गेलो असेन तर तुकाराम महाराजांसमोर नाक घासायला तयार आहे. आंदोलन संपल्यानंतर त्याचा पश्चाताप करेन. सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारसकरच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्याने बारसकरची साथ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...

गैरव्यवहाराची तक्रार: सरपंच पतीसह चार जणांवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?

जामखेड । नगर सहयाद्री:- ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल 9 ते...