spot_img
ब्रेकिंगभुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; लोणावळ्यात लागू होणार 'संचारबंदी

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; लोणावळ्यात लागू होणार ‘संचारबंदी

spot_img

पुणे। नगर सहयाद्री:-
लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर तसेच कारवाईत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केले आहे.

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण-तरुणी येतात आणि रात्री गोंधळ घालण्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करतात. पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिस कारवाई करतील.

रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीत देखील अतिउत्साहाच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. लोणावळा, मावळ परिसरातील धरणांमध्ये खोलीचा अंदाज न आल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...