spot_img
ब्रेकिंगसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. पाचपुते

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. पाचपुते

spot_img

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनाम्याचे आदेश
श्रीगोंदा। नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विविध अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आ. पाचपुते यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून धीर देत कोणीही खचून जाऊ नये. सरकार व आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन दिले.

दि. 25 सप्टेंबर रोजी आ. पाचपुते यांनी घोगरगाव, बनपिंपरी, मांडवगण, आढळगाव, घोडेगाव, चांडगाव, शेडगाव, पेडगाव रस्ता, श्रीगोंदा शहर, बोरुडेवाडी, पारगाव सुद्रिक, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, काष्टी आदी गावांमध्ये भेटी देत शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली. शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले. या दौऱ्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही सहभाग घेतला.

त्यांनी देखील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे धरणे फुटणे, बंधारे वाहून जाणे, रस्त्यांचे मोठे नुकसान, तसेच शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेली असून शेतीसाठी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पाहणी दौऱ्यात श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांपासून ते अनेक...

महाराष्ट्रात अस्मानी संकट, फडणवीसांचा दिल्ली दौरा, पंतप्रधानांचे मोठे आश्वासन?

नवी दिल्ली / नगर सह्याद्री - राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झाला...

मोहटा देवी यात्रा; विखेंचा लंकेंना टोला! काय म्हणाले पहा…

पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात: सुजय विखे...

केडगावमध्ये भाईगिरीचा थरार!, तरुणावर धारदार शस्राने वार, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव परिसरात दोन दिवसांपूव झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याच्या रागातून...