spot_img
ब्रेकिंगविठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूर मंदिर समिती देणार 'ती' सुविधा..

विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूर मंदिर समिती देणार ‘ती’ सुविधा..

spot_img

पंढरपूर । नगर सहयाद्री:-
विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मंदिर समितीने भक्तनिवासांमध्ये राहणाऱ्या भाविकांसाठी अल्पदरात नाश्ता आणि भोजन उपलब्ध करून दिले आहे. मंदिर समितीने हॉटेल स्वतः ताब्यात घेतले आहे, कारण जास्त दरांमुळे भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने उभारलेल्या विविध भक्तनिवासांमध्ये राहण्याची सोय केली आहे. या भक्तनिवासांमध्ये 364 खोल्यांमध्ये रोज जवळपास 1500 भाविक निवास करू शकतात. या भक्तनिवासांमध्ये चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी हॉटेलचा ठेका दिला होता, परंतु जास्त दरांमुळे तक्रारी आल्यामुळे मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री बंद करण्यासाठी, कालपासून अल्पदरात चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड या सर्व सुविधांकडे लक्ष ठेवत आहेत.

यासाठी चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली आहे, आणि जेवणाची थाळी फक्त 100 रुपयात उपलब्ध आहे. त्यामुळे भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री बंद होणार आहे. या भक्तनिवासांमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखांपेक्षा जास्त भाविक येतात, आणि आता त्यांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अल्पदरात मिळणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...