spot_img
महाराष्ट्ररिक्षा चालकांना गुड न्यूज; सरकार देणार दहा हजार?, वाचा सविस्तर

रिक्षा चालकांना गुड न्यूज; सरकार देणार दहा हजार?, वाचा सविस्तर

spot_img

Maharashtra News: महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून, ज्येष्ठ चालकांना आर्थिक मदत आणि इतर सुविधा देण्याची घोषणा केली आहे. या मंडळाची पहिली बैठक नुकतीच पार पडली.

या योजनेअंतर्गत, ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि मंडळाचे सदस्य असलेल्या राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर एकरकमी १०,००० रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल. ही घोषणा परिवहन मंत्री यांनी केली. यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल. मंडळाच्या सदस्यांसाठी अपघात विमा आणि जीवन विम्याचा देखील विचार केला जात आहे. तसेच, त्यांच्या मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा मानस आहे. कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास, चालकाला आर्थिक साहाय्य केले जाईल.

रिक्षा-टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या चालकांना, संघटनांना आणि स्टॅन्डला दरवर्षी आकर्षक बक्षिसे दिली जातील. राज्य सरकारने मंडळाला ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. संपूर्ण राज्यात जवळपास दहा लाख रिक्षा-टॅक्सी आहेत. या योजनेसाठी, चालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक वर्गणी, असे एकूण ८०० रुपये शुल्क भरावे लागेल. सदस्य नोंदणीसाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे, ज्यामुळे मोबाईलद्वारे सहजपणे नोंदणी करता येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

२५० कोटीचा विकास आराखडा तयार! आ. दाते यांची विधानसभेत मोठी मागणी, वाचा काय-काय?

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची मागणी आमदार...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६० लाखाचं घबाड गवसलं!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे...

अवयवदानाने तिघांना नवजीवन; एकाच्या जीवनात प्रकाश, खैर कुटुबांचा स्तुत्य निर्णय

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री:- काही व्यक्ती जरी या जगातून निघून जात गेल्या तरी त्यांच्या...

संगमनेरच्या ‘आका’ ना पराभव पचला नाही! माजी मंत्र्यांचे सुपारीबाज आंदोलक मैदानात; महायुतीने पुन्हा डिचवलं..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर...