spot_img
अहमदनगरपारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी...

पारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी…

spot_img

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणाच्या डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती अशा वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मांडओहळ धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.

आमदार काशिनाथ दाते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पंधरा दिवसापूव गोदावरी खोऱ्यातील नव्याने प्रस्तावित केलेले वासुंदे तांबडीकार, मोरवाडी, निमदरी व वारणवाडी या ठिकाणचे बंधारे तसेच मांडओहळ धरणाचे डाव्या कालव्याची गळती थांबवावी, कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामासाठी बैठक लावण्याची विनंती तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी विशेष दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती.

आमदार काशिनाथ दाते यांच्या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यांची मंत्रालयाच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कामांचे सादरीकरण करण्यात आले व चर्चेतून निर्णय घेण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुका दुष्काळी आहे.

त्यामुळे तेथे जलसिंचनाचे जेवढे जास्तीत जास्त स्रोत निर्माण करता येतील तेवढे प्राधान्य या कामाला अधिकाऱ्यांनी द्यावे, गोदावरी खोऱ्यातील वळण बंधाऱ्यातून उपलब्ध होणारे पाण्यातून आमदार दाते यांनी प्रस्तावित केलेले वासुंदे तांबडीकार, मोरवाडी, निमदरी व वारणवाडी या कामांना देखील चालना द्यावी अशा सूचना केल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा विभाग दिपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय ढोलसरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कडा अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग जगदीश पाटील, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे आदीं उपस्थित होते.

शेतीला परिपूर्ण आवर्तन मिळेल! 
मांडओहळ धरणाचे व कालव्याचे काम होऊन जवळपास 50 वर्ष पूर्ण झाले, तीस वर्षांपूव काही भागांमध्ये अस्तरीकरण काम झाले होते. परंतु आता ते देखील खराब झाले आहे, कालवा एकूण 26 किलोमीटर लांबीचा असून संपूर्ण खडकाळ भागातून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. संपूर्ण अस्तरीकरण झाल्यास पाण्याची बचत होईल. तसेच वासुंदे, खडकवाडी, पळशी येथील शेतीला सुद्धा आवर्तन परिपूर्ण मिळेल, मांड ओहळ नदीवरील बंधारे सुद्धा भरून घेणे शक्य होतील.
आमदार काशिनाथ दाते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...