spot_img
अहमदनगरपारनेरकरांना खुशखबर; शेतकऱ्यांना मिळणार १०५ कोटी, विश्वनाथ कोरडे काय म्हणाले पहा...

पारनेरकरांना खुशखबर; शेतकऱ्यांना मिळणार १०५ कोटी, विश्वनाथ कोरडे काय म्हणाले पहा…

spot_img

गणेश जगदाळे / नगर सह्याद्री –
सन २०२३ च्या खरिपाच्या पिकविम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १०५ कोटी रुपये इतकी रक्कम अधिकृतरीत्या जाहीर झाली असून लवकरच शासनाकडून ठरवून देण्यात येणाऱ्या गाईड लाईननुसार कुठल्या पिकासाठी नेमकी किती प्रमाणात रक्कम वितरीत होईल हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यातील नैसर्गिक परिस्थिती पाहून सबंधित पीकविमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी श्री.कोरडे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी म्हटले असून आजवर केलेल्या पत्रव्यवहाराचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांसमोर मांडले. यावेळी कोरडे यांच्या सोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुनिल थोरात, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी दुधाडे, राळेगण थेरपाळ गावचे सरपंच पंकज कारखिले, अशोक चेडे, किरण कोकाटे, अर्जुन नवले, नवनाथ सालके, सोपान मुंजाळ, तुकाराम येवले, गोकुळ ठुबे, सखाराम भागवत यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असलेल्या विविध उपाययोजनांची व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची माहितीही देण्यात आली. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या १०५ कोटी रुपये पिकविम्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महायुती सरकारचे आभारही कोरडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मानले.

२०२३ च्या खरीप हंगामात मुग, सोयाबीन, बाजरी, तुर, कांदा व उडीद या पिकांच्या ७१२५५ हेक्टर क्षेत्राचा ५७१८५ एकूण शेतकऱ्यांनी १४८८३४ अर्जांद्वारे पीकविमा उतरविण्यात आला असल्याचे सांगत सबंधित पीकविमा भरताना शेतकऱ्यांनी १ रुपया तर राज्य सरकारने २३९९१४५८८ इतकी तर केंद्र सरकारने १६८३८५३७३ अशी एकूण ४०८४४८७९६ रुपये रक्कम भरण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची १६.५० कोटी इतकी अग्रिम रक्कम खात्यावर जमा करण्यात आली होती आणि आता सन २०२३ च्या पिकविम्यापोटी १०५ कोटी इतकी रक्कम पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ ते २० दिवसांत वर्ग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जलजीवन योजणेच्या चौकशीमुळे माजी सैनिकाला मारहाण; सरपंच पतीसह दोघाविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime: तालुक्यातील भिमानदी काठावरील अजनुज येथील जलजीवन पाणी योजणेची चौकशी तुम्ही का लावली...

क्रिकेट खेळणं चिमुकल्याला पडले महागात; विजेचा धक्का लागून मृत्यू, कुठे घडली घटना?

Maharashtra News: रविवारी सायंकाळी क्रिकेट खेळत असताना विजेच्या धक्क्याने एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू...

‘जुन्या विश्वासाची’ काँग्रेस करणार ‘पोल खोल’; नागरी समस्यांवरून किरण काळेंचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शहरात मागील दहा वर्षांमध्ये कोणते ही ठोस असे विकास काम झालेले...

महिलेसोबत वाद केला, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला अन् हत्यारांसह जेरबंद झाला; नेमकं काय घडलं..

Ahmednagar Crime News: महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणाच्या कारमध्ये धारदार...