spot_img
महाराष्ट्रRadhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे...

Radhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा..

spot_img

राहाता | नगर सह्याद्री
Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्याप पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने राज्यातील १२४५ महसुली मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांनी लोणीत बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की सरकार नेहमी शेतकर्‍यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. असे असले तरी पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या राज्यात ५१८.१२ लाख टन हिरवा आणि १४४.५५ लाख टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला गेला आहे.

चार्‍याचे प्रमाण कमी होत असताना शेतकर्‍यांना आणि पशुपालकांना जनावरांचे पालनपोषण करताना येणार्‍या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत, पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळसदृश भागात चारा डेपो उभारून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी आम्ही केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मान्यता देऊन शासन निर्णय काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारा डेपो संदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर करत चारा डेपो उभारण्यास परवानगी दिली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...