spot_img
महाराष्ट्रRadhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे...

Radhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा..

spot_img

राहाता | नगर सह्याद्री
Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्याप पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने राज्यातील १२४५ महसुली मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांनी लोणीत बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की सरकार नेहमी शेतकर्‍यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. असे असले तरी पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या राज्यात ५१८.१२ लाख टन हिरवा आणि १४४.५५ लाख टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला गेला आहे.

चार्‍याचे प्रमाण कमी होत असताना शेतकर्‍यांना आणि पशुपालकांना जनावरांचे पालनपोषण करताना येणार्‍या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत, पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळसदृश भागात चारा डेपो उभारून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी आम्ही केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मान्यता देऊन शासन निर्णय काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारा डेपो संदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर करत चारा डेपो उभारण्यास परवानगी दिली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगावमध्ये अवजडचा पोरखेळ; बॅरिकेट चुकीच्या ठिकाणी टाकल्याने नारिकांना त्रास

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान...

बच्चू कडूंचे आंदोलन पेटले; समृद्धी मार्गावर टायर जाळले, मागण्या काय?

नागपूर । नगर सहयाद्री:- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी...

धुरळा उडणार, तयारीला लागा! कधी लागणार आचारसंहिता?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच...

हातचलाखी पडली महागात; दोन महिला जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दिपावली सणाच्या काळात कर्जत जिल्ह्यात सराफ व्यवसायीकांचे दुकाने आणि प्रवाशांचे लक्ष...