spot_img
महाराष्ट्रबळीराजासाठी आनंदवार्ता! 'ती' नोंदणी मोफत होणार

बळीराजासाठी आनंदवार्ता! ‘ती’ नोंदणी मोफत होणार

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री:
शेतकऱ्यांच्या वारसहक्क नोंदी आता अधिक सुलभ आणि विनामूल्य पद्धतीने होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने ‘जिवंत सातबारा’ नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना त्यांच्या वारसांची नोंदणी करणे सोपे होईल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे आणि जमिनीसंबंधी व्यवहार करणे अधिक सहज होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर वारसांची माहिती वेळेवर नोंदली जात नसल्यामुळे शेतकरी कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, विशेषतः सरकारी योजना, पीककर्ज आणि अनुदानांसाठी. ‘जिवंत सातबारा’ मोहिमेच्या माध्यमातून सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मृत शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती सातबारा उताऱ्यावर अधिकृतपणे नोंदवणे आणि जमीन मालकी हक्कावर स्पष्टता निर्माण करणे आहे. या योजनेसाठी कोणतीही शुल्क आकारली जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
मृत्यू प्रमाणपत्र
वारस प्रमाणपत्र किंवा शपथपत्र
ग्रामपंचायत किंवा पोलिस पाटील यांचा दाखला
सर्व वारसांची माहिती
रहिवासी पुरावा (तलाठी कार्यालयाचा दाखला)

तलाठी संबंधित माहिती तपासून अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे सादर करतो, आणि अंतिम नोंदणी ‘ई-फेरफार प्रणाली’द्वारे सातबारा उताऱ्यावर केली जाते.

उपक्रमाचे फायदे:
वारस नोंदणी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.
कायदेशीर अडथळे दूर होऊ शकतात.
सरकारी योजना आणि कर्ज मिळवणे सोपे होईल.
वारसांच्या नावावर अधिकृत जमीन नोंद मिळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...