spot_img
महाराष्ट्रबळीराजासाठी खुशखबर! 'त्या' योजनेची रक्कम ८००० हजार?

बळीराजासाठी खुशखबर! ‘त्या’ योजनेची रक्कम ८००० हजार?

spot_img

PM kisan Sanman Nidhi Scheme: राज्यातील बळीराजासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.योजनेत जर सरकारने रक्कम वाढवली तर तर शेतकऱ्यांना खूप दिलासा मिळणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या ६००० रुपये मिळतात. ही रक्कम ८००० रुपये केली जाऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम वाढवावी, अशी मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात ही रक्कम वाढवली जाऊ शकते.अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, पीएम किसान योजनेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहचवायचे आहे.

त्यांनी पैसे वाढवणार असल्याचे सांगितले नव्हते. परंतु कदाचित या नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. सरकार सध्या शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देते. परंतु वर्षाला ८००० देण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८ वा हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी १९ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. हा हप्त फेब्रुवारी २०२५ मध्ये येऊ शकतो. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हे यामागचे मुख्य उद्देश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...