RBI Repo Rate : गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात थेट मे 2020 मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता मात्र आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे त्याचा शेअर बाजारासोबतच भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होतो, यावर अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी अर्थात सीपीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरबीआयने 25 बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी काळात गृह व वाहन कर्जे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुरुवार दीनांक 13 फेब्रुवारी रोजी अहील्यानगरमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेता, उपविजेता यांच्यासह माती विभागातील 30 व गादी विभागातील 40 कुस्तीगीरांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पदक विजेत्या कुस्तीगीरांनी बक्षीस रूपाने मिळणाऱ्या गाड्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे बरोबर आणावीत. अधिक माहितीसाठी व कागदपत्रे जमा करण्यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ. संतोष भुजबळ मो.नं 9657610095 व कार्यालयीन सचिव निलेश मदने मो.नं 9225985555 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
किती झाली व्याजदर कपात
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी अर्थात सीपीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरबीआयने 25 बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे.
किरकोळ महागाई दर 4.2 टक्के राहील
दरम्यान, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 4.2 टक्के महागाई दराचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी याविषयी माहिती देताना, महागाई दरासाठी टोलरेंस बँड फिक्स केल्यापासून, सरासरी महागाई दर लक्ष्यानुसार आहे. किरकोळ महागाई दर बहुतेक वेळा कमी राहिला आहे. फक्त काही प्रसंगीच किरकोळ चलनवाढीचा दर आरबीआयच्या टोलरेंस बँडपेक्षा जास्त राहिला आहे.