spot_img
अहमदनगरमराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम, थेट तारीखच सांगितली

मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम, थेट तारीखच सांगितली

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थेट इशारा दिला आहे.मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं सांगितलं. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत, असं म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

‘सरकारने ५ जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार.’ असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. तसंच, ‘कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली. तिघांना शुभेच्छा आहेत. आमच्याकडून तिघांचं अभिनंदन. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नटकबाजी बंद करायची.’ असं जरांगे म्हणालेत.

तसंच, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं सांगत समाजाला सांभाळायचं, शिकायचं, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही जनतेचं मन जिंकायचं काम करा.’ असं आवाहन मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला केलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय.

‘लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. समाज तुमचं अभिनंदन करेल. असं जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला उत्तर देताना सांगितलं. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असल्याचं सांगत आमचा समाज बरळवाडी करणाऱ्याला किंमत देत नाही.’ असं मनोज जरांगे यांनी सांगितले. राज्यामध्ये महायुतीचे सरकार येताच आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झालेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...