spot_img
अहमदनगरबनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कारखान्यावर छापा; तिघांना अटक..

बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कारखान्यावर छापा; तिघांना अटक..

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री
श्रीरामपूर शहरातील बाजारतळ वॉर्ड क्र. 3 मधील एका घरात सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्यावर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या छाप्यात 79,970 रुपये किमतीचा बनावट विदेशी दारूचा साठा आणि उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बाजारतळ वॉर्डातील एका घरात दारू बनवण्याचे काम सुरू असल्याची खबर मिळाल्यावर पथकाने त्वरित छापा टाकला. यावेळी मनोज भाऊसाहेब पवार, शुभम पवार आणि हिराबाई पवार हे तिघे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर बनावट विदेशी दारू आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. चौकशीत आरोपींनी बनावट दारूसाठी लागणारा मद्यार्क राहुल बाळू फुलारे (रा. लोंढे मळा, खबडी जवळ) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली.

त्यानंतर फुलारेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 160 लिटर शुद्ध मद्यार्क सापडला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच राहुल फुलारे फरार झाला. त्याच्या वडिलांना – बाळू फुलारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या संपूर्ण कारवाईत 79,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील बनावट दारूच्या धंद्याला या कारवाईमुळे मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...