spot_img
ब्रेकिंगग्रामस्थांचा संयम सुटला; थेट तलाठी कार्यालयासमोर अंत्यसंस्कार! कारण काय?

ग्रामस्थांचा संयम सुटला; थेट तलाठी कार्यालयासमोर अंत्यसंस्कार! कारण काय?

spot_img

Maharashtra News:बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे तब्बल २० वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीकडे अद्याप पक्का रस्ता नसल्याने, अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला. गावातील एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट तलाठी कार्यालयासमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.

तरवाडी गावात शासनाच्या निधीतून स्मशानभूमी उभारण्यात आली असली, तरी तेथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे मृतदेह नेणे अत्यंत कठीण बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल, घसरट मार्ग आणि वाहतुकीचा अभाव यामुळे अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना पर्यायी ठिकाणं शोधावी लागतात.

गावातील एक शेतकरी निधन पावल्यावर त्यांच्या कुटुंबाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पण रस्ता नसल्याने मृतदेह नेणे अशक्य झाल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, हे ठळकपणे समोर आले आहे. रस्ता नसलेली स्मशानभूमी केवळ नावापुरती असून, ही समस्या गेली दोन दशके सुरूच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री...

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वावादी संघटनांचा रविवारी मेळावा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची...

‘कोठला परिसरात डेंग्यू मुक्त अभियान’; आयुक्त डांगे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसर्‍या आठवड्यात कोठला परिसरात...

तयारीला लागा! भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन; महापालिकेवर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर...