spot_img
अहमदनगरलग्नाचा बनाव करणार्‍या चार सराईत आरोपींना बेड्या; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा

लग्नाचा बनाव करणार्‍या चार सराईत आरोपींना बेड्या; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा

spot_img

श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी; पाच लाख रुपये किमतीची वाहने जप्त

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पैशासाठी लग्नाचा बनाव करणार्‍या सराईत चार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीची सुझुकी व एक व्हॅन जप्त करण्यात आली. श्रीगोंदा पोलीस ठाणे गु. रजि. नं. ०८३८/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३१८(४), ३०३(२),३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

नवरीची बनावट भूमिका करणारी एक महिला आरोपी, नवरीच्या बहिणीची भूमिका करणारी एक महिला व नवरीच्या दाजीची भूमिका करणारा इसम विठ्ठल किसन पवार (वय ३७ वर्ष रा. महालक्ष्मी खेडा पो. सावखेडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर) नवरीच्या काकाची भूमिका करणारा आरोपी ज्ञानेश्वर लक्ष्मण दाभाडे (वय ४५ वर्षे, रा. धुपखेडा ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी आहेत.

तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने संबंधित आरोपींना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा सहभाग यात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इको व्हॅन जप्त करण्यात आली आहे. आरोपींंना १६ सप्टेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असून त्यांना १७ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे. या तपासात दक्षिण मोबाइल सेल नेमणुकीचे पोकॉ राहुल गुंड व पोकॉ नितीन शिंदे यांची मदत मिळाली. गुन्ह्याचा पुढील तपास पोना श्री. इंगवले हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...