spot_img
अहमदनगरवन वनविभागाने "बिबट्या" पकडला! अहमदनगरच्या 'या' भागात अजूनही तीन' बिबटे? नागरिकांमध्ये भीतीचे...

वन वनविभागाने “बिबट्या” पकडला! अहमदनगरच्या ‘या’ भागात अजूनही तीन’ बिबटे? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
म्हसोबा झाप, गुरेवाडी, भोरवाडी कन्हेर या आदिवासी ग्रामीण भागात बिबट्यांचे प्रमाण असून मानवी वस्तीमध्ये बिबटे अनेक वेळा दिसून आले आहेत. पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्हसोबा झाप भागात मांडओहळ हे धरण व वनविभागाचे मोठे क्षेत्र असल्याने येथे बिबटे आहेत. बिबट्यांचा मानवी वस्ती कडे वाढलेला वावर लक्षात घेता या भागात बिबट्यांनी अनेक वेळा पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी केलेल्या पाठपुराव्या वन विभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते.

गेल्या आठ दिवसात दोन बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. भोरवाडी येथील भाऊसाहेब हांडे यांच्या शेतामध्ये दोन्हीही बिबटे पिंजरा लावून पकडण्यात आले आहेत. तरीही या भागामध्ये अजून तीन बिबटे आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजून बिबटे या भागात असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. पाठीमागच्या आठवड्यात भोरवाडी येथील शेतकरी अशोक निकम यांच्या गायीवर हल्ला करत बिबट्याने फडशा पाडला होता. पाळीव कुत्र्यांवरती पण बिबट्याने हल्ला केला आहे. या भागातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने ही त्वरित दखल घेत या भागात पिंजरे लावून आत्तापर्यंत दोन बिबटे जेरबंद केले आहेत अजूनही या भागात बिबट्या असल्याने वनविभाग सतर्क आहे. म्हसोबा झाप परिसरामध्ये जंगल सदृश्य व डोंगराळ भाग असल्याने या भागात अनेक हिंस्र प्राणी सुद्धा आहेत त्यामुळे या भागातील भय कधी संपत नाही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या भागात ग्रामस्थ बाहेर पडण्यास घाबरतात.

वनविभागाची सतर्कता
वनविभागाने सतर्कता दाखवत गेल्या आठवड्यापासून म्हसोबा झाप या भागात दोन बिबटे पकडले आहेत तरी पण या भागात अजून तीन बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ मध्ये भीतीचे वातावरण आहे. आदिवासी व डोंगराळ परिसर असल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अवघड वाटेने शाळेत ये-जा करावी लागते हिंस्र प्राणी सुद्धा असल्याने भय इथले संपत नाही अशीच काहीशी परिस्थिती आहे.
-प्रकाश गाजरे (सरपंच, म्हसोबा झाप)

वनविभागाचे कामगिरीचे कौतुक
टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन म्हसोबा झाप परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाळत ठेवून पिंजरा लावत भोरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब हांडे यांच्या शेतामध्ये दोन बिबटे जेरबंद केले आहेत त्यांनी केलेले हे धाडसी कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...