spot_img
अहमदनगर१५ वर्षांनंतर प्रथमच कर्मचाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन;'यांना' मिळाली प्रामाणिकपणाची पावती

१५ वर्षांनंतर प्रथमच कर्मचाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन;’यांना’ मिळाली प्रामाणिकपणाची पावती

spot_img

सुपा । नगर सहयाद्री:-
केंद्र शासनाच्या वतीने “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत असून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायटी कार्यालय यासह प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलात फडकू लागला आहे.हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज १४ ऑगस्ट रोजी पारनेर तालुक्यातील कडूस ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व व ग्रामपंचायत मधील प्रत्येक काम मन लाऊन व प्रामाणिक पणे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी पापुभाई शेख यांना आज ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.

१५ ऑगस्ट २६ जानेवारी रोजी दरवर्षी सरपंच, उपसरपंच यांना हा मान मिळतो. फक्त त्यांनीच झेंडा वंदन करायचे अशी ग्रामीण भागात प्रथा आहे. मात्र कडूसमध्ये या सर्व प्रथेला फाटा देत एका कर्मचाऱ्याच्या कामाची पोहोच पावती मिळाली आहे.

प्रामाणिक पणे काम करणाऱ्याला झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला. १५ वर्षात प्रथमच कडुस गावमध्ये व तालुक्यामध्ये कर्मचारी यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा मान दिला असल्याचे सरपंच मनोज मुंगसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...