spot_img
अहमदनगरवीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन

spot_img

भगवान फुलसौंदर / शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन
अहमदनगर / नगर सह्याद्री :
अहमदनगर शहरातील वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला.

याप्रसंगी याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे, जेम्स आल्हाट, गौरव ढोणे, जालिंदर वाघ, गिरिधर हांडे, संजय आव्हाड, अरुण झेंडे, दिनेश लाड, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यांपासून नगर शहरात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजे अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. वीजेची झालेली दरवाढ आणि वेळेवरही लाईट बील भरुनही नागरिकांना व व्यापार्‍यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही. परिणामी इर्न्व्हटर, जनरेटचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे. वीज प्रवाह अचानक कमी-जास्त होत असल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बिघडत आहेत.

थोडे वादळ व पावसाचे वातावरण तयार झाले की लाईट चार-चार तास तर कधी-कधी रात्रभर येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागते आहे. वीज वितरण कार्यालयात फोन लावला तरी फोन उचलत नाही आणि उचललाच तर व्यवस्थीत उत्तरे देत नाही. तरी ही वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विज वितरण कंपनीकडून भारनियमन जाहीर झालेले नाही तरीही दिवसभरातून अनेकवेळा लाईट घालविली जाते. त्यामुळे नागरिक, व्यापारी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लाईट नसल्याने पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होते. अचानक कमी-जास्त विज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे बिघडण्याची प्रमाणही वाढले आहे. सध्याचे वादळ-वारा, पाऊसाचे दिवस असल्याने याचे नियोजन करणे गरजे आहे, परंतु विज वितरण कंपनीचे लक्ष नसल्याने नागरिकांना नहाक त्रास होत आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे फुलसौंदर म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...