spot_img
ब्रेकिंगरेल्वेचा भीषण अपघात पाच प्रवाशांचा मृत्यू

रेल्वेचा भीषण अपघात पाच प्रवाशांचा मृत्यू

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही अंतरावर झालेल्या रेल्वे अपघातात सोमवारी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. दोन लोकल ट्रेन आजुबाजूने जात असताना या ट्रेन्सच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामुळे आठ जण रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान एक लोकल ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने आणि दुसरी सीएसएमटीला जात होती. या दोन्ही लोकल ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गद होती. त्यामुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. यापैकी काही प्रवाशांच्या खांद्याला बॅगा लावल्या होत्या. ट्रेनमध्ये प्रचंड गद असल्याने हे प्रवासी ट्रेनमधून बाहेर आले होते. या दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्या वेगात होत्या.

यावेळी काही प्रवाशांच्या बॅगचा धक्का दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना लागला आणि फुटबोर्डवर काही इंच अंतरात पाय ठेवून उभे असलेले प्रवासी ट्रेनमधून खाली पडले, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. हा अपघात साडेनऊ वाजता घडला. त्यानंतर 9.50 पर्यंत या प्रवाशांना रुग्णावाहिका आणून रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहितीही मध्य रेल्वेच्या जनसंर्पक अधिकाऱ्यांनी दिली.

घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून एकूण 8 प्रवासी पडले आणि त्यापैकी काहींचा अपघातात मृत्यू झाला हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.

अपघात कुठे झाला?
दरम्यान, बाजूने जाणाऱ्या ट्रेनला घासून प्रवासी खाली पडल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे. दोन ट्रेनमध्ये (रुळांमध्ये) इतकं कमी अंतर सहसहा पाहायला मिळत नाही. मात्र, जिथे हा अपघात झाला ती जागा थोडी धोकादायक असल्याचं प्रवाशांनी सांगितलं. दिवा स्थानकातून सुटल्यानंतर ट्रेन दीड किमी अंतर पार केल्यानंतर वळण घेते. दिवा व मुंब्रा स्थानकांमध्ये बरंच अंतर असल्यामुळे या भागात ट्रेन भरदाव वेगाने धावत असते. ट्रेन वळण घेत असताना आतील प्रवाशी आपोआप दुसऱ्या बाजूला ढकलले जातात. त्यामुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान दरवाजात उभे राहत नाहीत. मात्र आज कसारा-सीएसएमटी ट्रेन इतकी तुडुंब भरलेली की मुंगीलाही आत शिरायला जागा नव्हती. परिणामी हा अपघात घडला. दरम्यान, हे वळण धोकादाक असल्याची बाब मुंब्रा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेख यांनी देखील उपस्थित केली. ते म्हणाले, “दिवा-मुंब्र्यादरम्यानचं वळण अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या वळणावरून जलद लोकल चालवणं योग्य नाही. मध्य रेल्वे प्रशासन येथून जलद लोकल का चालवतं तेच कळत नाही. कसाऱ्यावरून येणारी गाडी तुडुंब भरून आलेली असते. अशी भरधाव गाडी या वळणावरून चालवणं अत्यंत धोकादायक आहे. दरम्यान, हाच मुद्दा खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपस्थित केला आहे.

प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही : शरद पवार
ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी लोकलमधून पडले. लोकलमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे हा अपघात असल्याची माहिती आहे. रेल्वे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी ट्वीट करत लिहिले की, “मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण असल्याचं सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. “केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे,” असे म्हणत शरद पवारांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांनी राज्याचा बोजवारा उडवला; मुंब्रा अपघातावर राज ठाकरे आक्रमक
मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर हल्लाबोल केला आहे. “बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा आणि राज्याचा बोजवारा उडालाय,” असं म्हणत त्यांनी गर्दीचा, नियोजनशून्य नागरी वाढीचा आणि रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा खरपूस समाचार घेतला.

“मुंबईचं विद्रूपिकरण झालंय, सरकार झोपेत आहे”
पुण्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “रेल्वे अपघात ही केवळ ट्रॅकवरील चूक नाही, हे शहरांचं व्यवस्थापन कोलमडल्याचं लक्षण आहे. मेट्रो आणि मोनोने काहीही फरक पडत नाही, मूलभूत प्रश्नांवर सरकार गप्प आहे.” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“रेल्वे मंत्री संध्याकाळी लोकलने प्रवास करून दाखवावं”
राज ठाकरे यांनी थेट रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिलं की, “गर्दीचा अनुभव घ्यायचा असेल, तर मंत्री स्वतः संध्याकाळी लोकल प्लॅटफॉर्मवर जावं आणि सामान्य प्रवाशांसोबत प्रवास करून दाखवावं. तेव्हाच कळेल लोक काय भोगत आहेत,” असं म्हणत राज ठाकरेंनी रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिलं.

“शहरांच्या समस्या सोडवा, अन्यथा मनसे आंदोलन करेल”
पुढे बोलताना म्हणाले, “रेल्वे दुर्घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. लोकल फेऱ्या वाढवा, नाहीतर आम्ही आंदोलन करू. मुंब्र्यासारख्या धोकादायक वळणांकडे सरकार लक्ष देत नाही,” असं म्हणत राज्य सरकारला थेट इशाराच दिला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पीओपी गणेश मूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; ‘ही’ अट ठेवली कायम

मुंबई / नगर सह्याद्री : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्ती विरुद्ध शाडूच्या मूर्ती...

अतिवृष्टीमुळे नुकसान; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे विधान…

  नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे / राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव...

विकासकामांच्या माध्यमातून केडगावला नवी दिशा दिली:आ. जगताप

लिंक रोड परिसरातील सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व वृक्षारोपण अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- केडगाव हे शहराचे सर्वात...

‌‘गोरेश्वर‌’साठी 48 टक्के मतदान! बाबासाहेब तांबे की बाजीराव पानमंद?, निकालाकडे पारनेरकरांचे लक्ष

पारनेर | नगर सह्याद्री गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 चे मतदान...