spot_img
ब्रेकिंगदिवाळीपूर्वीच फुटणार आमदारकीचे फटाके? विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार..

दिवाळीपूर्वीच फुटणार आमदारकीचे फटाके? विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार..

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, तर हरियाणामध्ये ३ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात एकाचवेळी निवडणुका होण्याची शक्यता असून, साधारणपणे ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, अशी चिन्हे आहेत.

सध्याच्या विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा दुसर्‍या दिवशी नवीन विधानसभा स्थापन करणे आवश्यक आहे. परिणामी, हरियाणा विधानसभेची स्थापना ४ नोव्हेंबरपर्यंत झाली पाहिजे. २००९ पासून, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत आहेत. दोन्ही विधानसभांचा कार्यकाळ २३ दिवसांनी संपत असल्याने नियमानुसार दोन्ही राज्यांच्या एकत्र निवडणुका घेणे आवश्यक आहे. दरम्यान, यंदा २९ ऑक्टोबर ते ०३नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी साजरी होणार आहे.

सहसा सणांच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्यासाठी पुरेसा वेळ असला तरी हरियाणातील वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात आधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. सन २०१९ मध्ये दोन्ही राज्यांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका झाल्या होत्या. त्यानुसार, यावर्षी २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान त्याच तारखेच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यास उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना फटाके फोडण्याची मोठी संधी मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...