spot_img
ब्रेकिंगअग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाला, त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

बनासकांठातील डीसा भागात असलेल्या फटाका कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. याची माहिती लगेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालं आहे. भिंती, छप्पर कोसळलं असून ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर स्फोटाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत.

दरम्यान, दीपक ट्रेडर्स नावाच्या कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. या ठिकाणी फटाके तयार केले जातात. स्फोटानंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. जिल्हाधिकारी माहिर पटेल घटनास्थळी पोहोचले आहेत. या कारखान्याला फटाके तयार करण्याचा परवाना मिळाला होता की नाही? याची चौकशी सध्या केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत टोळक्याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; नेमकं काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली...

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ...

काळजी घ्या! उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाने दिला हा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या...

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट...