spot_img
ब्रेकिंगअखेर विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली! दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद, आज घोषणा...

अखेर विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली! दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद, आज घोषणा होणार..

spot_img

Election Commission Of India Press Conference: भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा शक्यता आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. सोमवारी दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते. याशिवाय, आज दुपारी 12 वाजता राज्यपालनियुक्त 7 आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. यामुळं राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उमेदवार ठरविण्यात खा. नीलेश लंकेच किंगमेकर!

सारिपाट / शिवाजी शिर्के:- लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश...

कृषिनाथ कारखान्याने ऊस उत्पादकांना न्याय दिला; पद्मश्री पवार

खा. नीलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन...

मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे यांच्या सोबत गुप्त बैठक

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली असून राजकारणात घडामोडींना वेग आला...

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा...