spot_img
ब्रेकिंग...अखेर नारायणगव्हाण ग्रामस्थांच्या लढ्याला यश! चौपदरीकरणासाठी 'असा' निघाला तोडगा

…अखेर नारायणगव्हाण ग्रामस्थांच्या लढ्याला यश! चौपदरीकरणासाठी ‘असा’ निघाला तोडगा

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
नगर – पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण गावच्या चौपदरीकरणाच्या संबंधित प्रलंबित कामांसाठी सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांने केलेल्या उपोषणाच्या लढ्याला यश आले आहे. आ. निलेश लंके यांच्या मध्यस्तीनंतर यावर तोडगा निघाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

महामार्गावर अपघातांची मोठी मालिका सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस गाड्यांची वाढती संख्या व अरुंद रस्ता यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून महामार्गावर प्रवास करावा लागतो. गावच्या सुरक्षिततेसाठी सचिन शेळके यांसह ग्रामस्थांनी सोमवारी (दि. ११ मार्च) उपोषण सुरू केले होते. आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनस्थळी पंचक्रोशितील ग्रामस्थ, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, मनसे नेते अविनाश पवार, यांसह विविध पदाधिकार्‍यांनी भेटी देवून आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवले.

मदतीची भुमिकाही ठेवली परंतु सचिन शेळके यांनी रस्त्याच्या मोजणीची तारीख मिळावी यासाठी आग्रह धरला होता. उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत तातडीने संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. तातडीने प्रस्तावाच्या दुरुस्त्या केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांताधिकारी यांची नियुक्ती केली. त्यानंतर सचिन शेळके सह ग्रामस्थांचे उपोषण आमदार निलेश लंके व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन सोडण्यात आले.

यावेळी गावचे उपसरपंच राजेश शेळके यांनी आमदार निलेश लंके यांचे आभार मानले. उपोषणकर्ते सचिन शेळके यांनी आंदोलनाला पाठबळ देणार्‍या सर्वांचे आभार मानत आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच मनीषा जाधव, चेअरमन बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब शेळके, तानाजी पवळे, रामदास जाधव,गणेश शेळके, अर्जून वाल्हेकर, लक्ष्मण शेळके, संपत जाधव, धोंडीबा गायकवाड, हौसिराम कुदळे आदींसह महिला, विद्यार्थी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...