spot_img
अहमदनगरभीषण अपघात; दोन युवक ठार, कुठे घडली घटना? वाचा..

भीषण अपघात; दोन युवक ठार, कुठे घडली घटना? वाचा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे भीषण अपघातात परांडा येथील दोन युवक सोमनाथ दत्तात्रय कदम (वय 24) व शिवाजी बबन कदम (वय 35 दोघेही रा. कोकरवाडी ता. परंडा जि. धाराशिव) हे ठार झाले आहे.

(मंगळवार) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सोमनाथ कदम व शिवाजी कदम हे दोघे कामानिमित्त कोकरवाडी (ता. परंडा) येथून करमाळा मार्गाने मोटारसायकलवरून (क्र. एम एच 45 आर 9718) मिरजगावच्या दिशेने येत असतांना अज्ञात वाहनाने समोरासमोर जोराची धडक दिली.

या अपघातात सोमनाथ दत्तात्रय कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवाजी बबन कदम यांचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय कासार हे तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...