spot_img
अहमदनगरशेतकरी पुन्हा चिंतेत; परतीचा पावसाचा कांदा पिकाला फटका..

शेतकरी पुन्हा चिंतेत; परतीचा पावसाचा कांदा पिकाला फटका..

spot_img

श्रीगोंदा ।नगर सहयाद्री:
तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सतत ढगाळ हवामानामुळे तसेच तालुक्यातील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पण याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाल कांदा व आणि उन्हाळ कांद्याची महागडी बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती पण परतीचा सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची रोपे उद्ध्वस्त झाली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.

लागवड केलेल्या कांदा पिकावर मावा व करपा ने प्रचंड आक्रमण केल्याने लागवड केलेले कांदा पीक शेतातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे लागवडीला आलेली लाल कांदा रोपे व कांदा पिके खराब झाली आहेत.

दुसरीकडे उन्हाळा लाल कांद्याची रोपे उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी दुकानांमध्ये ही बियाण्यांचा तुटवडा दिसून येत आहे. यामुळे शेतकरी उन्हाळ कांद्याची रोपे कशी तयार करावी या संकटात शेतकरी सापडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे नुकसान
यंदा गुलाबी कांद्याचे रोप व कांदा लागवड केली होती कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षांनी कांदा लागवड केली होती परंतु यंदा ढगाळ वातावरण आणि व परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. लाल कांदा व उन्हाळी कांदा बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती परंतु ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने जागेवर उध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे असे प्रगतशील शेतकरी बाळू चव्हाण व मारुती भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मविआत ठाकरे गट-काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद, महाराष्ट्रात गोंधळ, दिल्लीत खळबळ!

मुंबई / नगर सह्याद्री - मविआचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. २३० ते...

आंबेडकरी, मातंग समाजाबद्दल अपशब्द वापरणार्यावर कारवाई करा

अन्यथा सोमवारी समाजाचा मोर्चा / पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडाडणार. अहिल्यानगर / नगर सह्याद्री - समस्त आंबेडकरी...

मोठी बातमी : संदीप कोतकर यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

अहिल्यानगर | नगर सह्याद्री विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून नगर शहरात माजी महापौर संदीप कोतकर हे...

राजकीय वातावरण तापलं! निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का? माजी मंत्री राजीनामा देणार..

  Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बागुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे....