spot_img
अहमदनगरशेतकरी पुन्हा चिंतेत; परतीचा पावसाचा कांदा पिकाला फटका..

शेतकरी पुन्हा चिंतेत; परतीचा पावसाचा कांदा पिकाला फटका..

spot_img

श्रीगोंदा ।नगर सहयाद्री:
तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सतत ढगाळ हवामानामुळे तसेच तालुक्यातील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पण याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाल कांदा व आणि उन्हाळ कांद्याची महागडी बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती पण परतीचा सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची रोपे उद्ध्वस्त झाली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.

लागवड केलेल्या कांदा पिकावर मावा व करपा ने प्रचंड आक्रमण केल्याने लागवड केलेले कांदा पीक शेतातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे लागवडीला आलेली लाल कांदा रोपे व कांदा पिके खराब झाली आहेत.

दुसरीकडे उन्हाळा लाल कांद्याची रोपे उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी दुकानांमध्ये ही बियाण्यांचा तुटवडा दिसून येत आहे. यामुळे शेतकरी उन्हाळ कांद्याची रोपे कशी तयार करावी या संकटात शेतकरी सापडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे नुकसान
यंदा गुलाबी कांद्याचे रोप व कांदा लागवड केली होती कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षांनी कांदा लागवड केली होती परंतु यंदा ढगाळ वातावरण आणि व परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. लाल कांदा व उन्हाळी कांदा बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती परंतु ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने जागेवर उध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे असे प्रगतशील शेतकरी बाळू चव्हाण व मारुती भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...