spot_img
ब्रेकिंगफडणवीस सरकारचा शेतकऱ्यांबद्दल मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांबद्दल मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्य सरकारची आज गुरुवारी कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाने आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत करण्याविषयी निर्णय झाला. हा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

आज गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसापासून कामगारांपर्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. या निर्णयाने छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीत सुधारणा विधेयक मांडण्यास मंजूरी देण्यात आलीय.

तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारीपड म्हणून शासन जमा करण्यात येताहेत. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे.

१२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर असा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. आता अशा जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या २५% रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...