spot_img
अहमदनगरखळबळजनक! शिक्षक निघाला भक्षक? अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

खळबळजनक! शिक्षक निघाला भक्षक? अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

spot_img

Ahmednagar Crime: शिक्षकाने इयत्ता तिसरी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. या शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मंथन क्लासच्या मुलींसोबत तिचा राहिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी गेली होती व ती रोजच्याप्रमाणे त्यांच्या शाळेच्या वर्गात बसली होती. त्यानंतर सदर विद्यार्थिनी ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत तिच्या दोन मैत्रीणींना घेऊन पळत पळत घरी आली. तू घरी का आली असे तिच्या आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

वर्गशिक्षकांनी तिला पाठीमागून येऊन तिच्याशी असभ्य वर्तन केले. त्यानंतर सदर मुलीच्या आई- वडिलांनी मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. मुख्याध्यापकांनी सदर मुलीच्या पाच मैत्रिणींना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. चौकशी केली असता सदर शिक्षकांनी इतर मुलींच्या बाबतीतही असाच प्रकार केल्याचे या मुलींनी सांगितले.

वर्गशिक्षक बाळशिराम यशवंतराव बांवळे हे नवीन शिक्षक म्हणून शाळेत आल्यापासून नेहमी असे प्रकार करत असल्याचे यावेळी या मुलींनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५, बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....