spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! 'महायुतीच्या मंत्र्याने महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले'; राजीनामा घेतला जाणार?

खळबळजनक! ‘महायुतीच्या मंत्र्याने महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले’; राजीनामा घेतला जाणार?

spot_img

Maharashtra politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात आणखी एका प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. आता भाजपच्या एका मंत्र्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांनी दावा केला आहे की, गोरे यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवले आणि तिचा छळ केला.

काही मीडिया रिपोर्टनुसार, जयकुमार गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेसोबत गैरवर्तन केले. त्या महिलेला सतत त्रास दिला जात असल्याचा आरोपही आहे. विशेष म्हणजे, या महिलेनं यापूर्वी गोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नव्याने तपासणी करावी. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागतो, पण भाजपच्या मंत्र्यांवर कारवाई केली जात नाही. जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केला, तिला नग्न फोटो पाठवले, आणि आता ती महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. असं राऊत यांनी सांगितलं.

महिलेने याबाबत तक्रार केली असून जयकुमार गोरे यांनी 2016 पासून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तक्रार केल्यानंतरही त्यांना अटक झाली नव्हती. अखेर, सातारा जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्यांना 10 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर त्यांनी लेखी माफी मागितली होती, पण तरीही महिलेला पुन्हा त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

गोरेंनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता अशी माहिती आहे. मात्र, आता पुन्हा त्रास दिला जातोय अशीही तक्रार पीडित महिलेनं केली आहे. विजय वडेट्टीवार यांनीही भाजप सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं, “एक मंत्री महिलेला नग्न फोटो पाठवतो, जेलमध्ये जातो, आणि नंतर पुन्हा तिच्या मागे लागतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, मग जयकुमार गोरे यांचा का नाही?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विना परवाना रस्ता खोदणे पडले महागात’; महापालिकेची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे महिनाभरापूव नव्याने करण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता...

रवींद्र धंगेकर पुण्यातील वाल्मिक कराड! काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप..

पुणे | नगर सह्याद्री काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर रामराम करत रविंद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये...

जीवाचा थरकाप उडवणारा प्रकार! सात मिनिटांमध्ये सिलिंडरचा स्फोट, नेमकं काय घडलं?

Maharashtra News: छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसरातल्या एका फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्याने...

बाबांची शिर्डी पुन्हा हादरली! पोटच्या पोराने बापाचा काटा काढला?

शिर्डी । नगर सहयाद्री:- महिनाभरापूर्वी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना भोसकत संपवल्यानंतर दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण...