spot_img
मनोरंजनEntertainment News : तमन्ना भाटियाचे खुललं सौंदर्य; फोटोने वेधले साऱ्यांचे लक्ष

Entertainment News : तमन्ना भाटियाचे खुललं सौंदर्य; फोटोने वेधले साऱ्यांचे लक्ष

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम –
अभिनेत्री तमन्ना भाटियाने दक्षिणात्य चित्रपटांसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मोठ्या पडद्यावर ती नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसते. अभिनयासोबतच ती अनेकदा तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. येत्या काही दिवसांवर आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सवानिमित्त तमन्ना भाटियानं खास मनमोहित करणारे फोटोशुट केलं आहे.

अलीकडेच हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कृष्ण आणि राधा या थीमला अनुसरून केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या फोटोंमध्ये तमन्नाने पेस्टल निळ्या आणि गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे.

सोबत हेवी बॉर्डर असलेला गुलाबी दुपट्टा या लेहेंग्याच्या सौंदर्यात भर घालत आहे. राधाच्या लुकमध्ये तमन्ना सुंदर दिसत आहे. या लुकसह तिने राधाप्रमाणे कपाळावर लावलेला गंध विशेष लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये जंगलात एका झाडाखाली कृष्णाची वाट पाहत असलेल्या राधाच्या रुपात तमन्ना दिसत आहे.

तर दुसऱ्या फोटोत श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या तमन्नाच्या हातात मोरपंख दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने एकापेक्षा एक पोज देत सर्वांचे लक्ष वेधूंन घेतले आहे. दरम्यान, प्रसिद्ध डिझायनर तौरानीने जन्माष्टमीपूर्वी राधा-कृष्णाच्या कथेवर नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे. त्याच्यासाठी तमन्नाने हे फोटोशुट केलं आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...