spot_img
अहमदनगरनगरमध्ये औरंगजेबच्या नावाने अतिक्रमण; मनसे आक्रमक, दिला खळखट्याक इशारा..

नगरमध्ये औरंगजेबच्या नावाने अतिक्रमण; मनसे आक्रमक, दिला खळखट्याक इशारा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अखंड हिंदूस्थानातील अतिक्रमणधारण असलेल्या औरंगजेबच्या नावाने शेवटची आंघोळ झाली म्हणून, प्रचलित करण्यात आलेल्या नगर तालुक्यातील भिंगार भागात आलमगीर मध्ये अकारण कागदपत्रांची हेराफेरी करून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावर तात्काळ कारवाई करून हे हटवण्यासाठी पावले उचलावी अशी मांगणी ज़िल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली.

लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने यावर हातोडा चालवणार. कारण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना नरकयातना देऊन त्यांचा जीव घेतलेल्या कृर अश्या औरंग्याचे कोणतेही अवशेष हे कुणाला चांगला विचार देऊ शकत नाही कारण क्रूरता कधीच प्रेरणादायी असू शकत नाही. उलट या क्रूरतेला आदर्श मानून देशविरोधी कारवाया करताना अनेक औलादींच्या आत्तापर्यंत शासनाने मुसक्या आवळल्या आहेत. नगर जिल्ह्याचा हा कलंक लवकरात लवकर पुसला गेला नाही तर भविष्यात यांचे गंभीर परिणाम पुढे येतील आणि यावा जबाबदार प्रशासन राहील.

छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून स्वराज्यावर अतिक्रमण करू इच्छित व्यक्तीचे विचार या अशा वेगवेगळ्या थडग्यातून जिवंत ठेवण्याचे काही कारण नाही. आपण तात्काळ याचा बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्र सैनिक तयारीत आहेतच कारण संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक या मोहिमेत सहभागी होतील ते प्रशासनाला परवडणारं नसेल, यावर विचार करून आपली भुमिका येत्या ८ दिवसांत स्पष्ट करा अन्यथा आमचा हातोडा चालणारच आहे यात शंका नाही. असा इशारा सुमित वर्मा यांनी ज़िल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...